1“त्या सर्वशक्तिमानाने न्यायवेळ का नेमून ठेवली नाही?
2आणि काही जण हद्द दर्शविणाऱ्या खुणा सरकवतात.
3ते अनाथ मुलांची गाढवे चोरतात.
4ते गरजंवताना त्यांच्या मार्गापासून बहकवतात.
5गरीब लोक वाळवंटात हिंडून अन्न शोधणाऱ्या मोकाट गाढवाप्रमाणे आहेत ते काळजीपूर्वक अन्नाचा शोध घेतात.
6गरीब लोक रात्रीपर्यंत इतरांच्या शेतात कापणी करतात,
7त्यांना रात्री कपड्यांशिवाय झोपावे लागते.
8ते डोंगरावरील पावसाने भिजतात,
9दुष्ट लोक स्तनपान करणारे बाळ आई जवळून घेतात.
10ते कपडे नसल्यामुळे उघडेच असतात,
11ते आवाराच्या आत तेल काढतात,
12शहरात मरणास टेकलेल्या मनुष्यांचे दु:खद रडणे ऐकू येते,
13काही लोक प्रकाशा विरूद्ध बंड करतात.
14खुनी सकाळी लवकर उठतो
15ज्या मनुष्यास व्यभिचार करायचा आहे तो रात्रीची वाट बघतो.
16रात्रीच्या वेळी अंधार असतो तेव्हा दुष्ट लोक दुसऱ्यांची घरे फोडतात.
17त्या दुष्टांना काळीकुटृ रात्र सकाळसारखी वाटते.
18पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात,
19हिवाळ्यातल्या बर्फापासून मिळालेले त्यांचे पाणी उष्ण आणि कोरडी हवा शोषून घेते.
20ज्या उदराने त्यास जन्म दिला ती विसरून जाईल,
21दुष्ट माणसे वांझ बायकांना त्रास देतात ज्यांना मुले झालेली नाहीत,
22तरी देव आपल्या सामर्थ्याने बलवानास राखतो,
23देव दुष्टांना आपण सुरक्षित आहेत असा विचार करण्यास भाग पाडतो
24ते उंचावले जातात परंतू थोड्या काळापुरते नंतर ते जातात.